महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, राहुल गांधी यांचा प्रहार
पुणे- महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यामुळे महिला या कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (दि.२२) पुण्यात उत्साहात पार पडला. यावेळी जेन झी युवकांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राहुल गांधी…
पैंजण विकत घेण्याच्या बहाण्याने आले आणि ७ पैंजण चोरुन नेले, ५ जणांची टोळी जेरबंद
पुणे – चांदीची मोड देऊन पैंजण विकत घेण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषांनीसराफाची नजर चुकवून ७ पैंजण चोरुन नेले. या प्रकरणी ५ जणांच्या टोळीला लोहगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. कल्पना अंकुश कांबळे (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर), पांडुरंग राम गायकवाड (वय ४२, रा. रुपीनगर, निगडी), दिक्षा वसंत शेलार (वय ३२, रा. रुपीनगर, निगडी), सुमन बाबासाहेब…
पुण्यात गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता
पुणे – पुण्यात मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी २४ वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे यांचा सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. याप्रकरणी पती राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू, सासरे व नणंदेसह ११ जणांवर गुन्हे दाखल होऊन आरोपपत्र दाखल झाले….
मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर भातन बोगद्यात अपघात, बसची चार वाहनांना धडक, १० जण जखमी
खोपोली – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील भाताण बोगद्यात ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात होऊन आठ ते दहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात एक…
श्रावणधारा कविसंमेलन उत्साहात संपन्न
पिंपरी- शेजारच्या हिरव्यागार डोंगररांगेतून शुभ्रधवल पाण्याच्या धारा खळाळत होत्या आणि पायथ्याच्या अथांग जलाशयात विसावत होत्या. निसर्गसंपन्न आसमंतात श्रावणसरी बरसत होत्या आणि याच डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिवे गावातील ज्ञानदीप विद्यालयाच्या सभागृहात सुरेल शब्दांच्या सरी बरसत होत्या! कविता, भावना, विचार आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवत ‘श्रावणधारा कविसंमेलन’ मोठ्या उत्साहात रंगले होते. खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गसंपन्न शिवे येथील…
‘अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती’ -पद्मश्री गिरीश प्रभुणे
पिंपरी – अवयवदान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती होय.कारण अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आणि विद्यादानापेक्षा अवयवदान आधिक श्रेष्ठ आहे. म्हणून गुणवंत कामगारांनी व्यापक मोहीम राबवून अवयव दान जनजागृती करावी असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम व महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी…
पुण्यात पीएमपीएमएलच्या धडकेत शॉर्टफिल्म दिग्दर्शकाचा मृत्यू
पुणे- पुण्यात एका दुर्दैवी अपघातात एका २१ वर्षीय शॉर्ट फिल्म दिग्दर्शकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटजवळ सोमवारी १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी घडली. रिद्धेश विनय शिंदे (वय २१, रा. दापोडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिद्धेश हा एक तरुण आणि उदयोन्मुख लघु चित्रपट दिग्दर्शक होता. त्याने नुकतीच त्याची बीएससी…
पुणेकरांनो.. आता MH 12 नाही, तर MH 61, पुण्यासाठी आरटीओकडून नवीन मालिका
पुणे- पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ ही नंबरप्लेट आता लवकरच बदलण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वाहनांना देण्यात येणाऱ्या ‘एमएच-१२’ नोंदणी क्रमांकांची दोन अक्षरी मालिका संपत आल्याने पुण्यासाठी ‘एमएच-६१’ ही नवीन नोंदणी मालिका देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आरटीओ अंतर्गत सुरू असलेली ‘एमएच-१२’ (MH-12) ही दोन अक्षरी नोंदणी मालिका (सध्याची…
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी अभाविप आणि एनएसयूआय च्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्याच्या सीओईपी (COEP) टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल परिसरात तुफान राडा झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनएसयुआयचे कार्यकर्ते हॉस्टेलमध्ये घुसले आणि त्यांनी विद्यार्थिनींवर आगामी कार्यक्रमासाठी नाव नोंदवण्यासाठी जबरदस्ती…
‘आय फोन’ने घेतला एकाच कुटुंबातील तिघांचा जीव, थरारक घटनेने संभाजीनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर – आयफोनचा हप्ता भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आईवडील आणि मुलाचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला. ही घटना तिसगाव परिसरातील टेकडीवर शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरून गेले आहे. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९ वर्षे ) मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८ वर्षे ) संगीता मुरलीधर चांदगुडे (वय ४२ वर्षे )अशी मृतांची नावे आहेत….
