ब्रेकिंग न्यूज

आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू 

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या १२ वर्षाच्या मुलीचा संशयस्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे….

Read More

17 सप्टेंबरपासून भाजप राबवणार देशव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’

नवी दिल्ली – येत्या १७ सप्टेंबरपासून म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिनाभर देशव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव पक्ष अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. सेवेसाठी समर्पण मोदींच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पक्षाचे अभियान समर्पित सेवेभोवती केंद्रित…

Read More

मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू ; गणपती आगमन मिरवणुकीत घडली दुर्घटना 

मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू गणपती आगमन मिरवणुकीत घडली दुर्घटना मुंबई – मुंबईतील भुलेश्वर परिसरातील आगमन मिरवणुकीत २२ फूट उंच ‘भुलेश्वरचा राजा’ या गणपतीची महाकाय मूर्ती मंडपापासून अवघ्या ५०-६० फूट अंतरावर असताना अचानक कोसळली. शनिवारी (दि.२२) रात्री ९:५१ च्या सुमारास बलराम मर्चेंट रोड, जय अंबे चौक भुलेश्वर या ठिकाणी ही दुर्घटना घडली. या …

Read More

कापूरहोळ चौकात उद्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको, पुणे सातारा महामार्गावरील वाहतुकीत असे आहेत बदल

पुणे – भोंगवली येथील जी एस प्रकल्पाच्या विरोधात उद्या रविवारी (दि. २३) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सहभागी होणार असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे सातारा मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. सकाळी ८ पासून आंदोलन संपेपर्यंत पुढील…

Read More

महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, राहुल गांधी यांचा प्रहार

पुणे- महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यामुळे महिला या कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आज (दि.२२) पुण्यात उत्साहात पार पडला. यावेळी जेन झी युवकांनी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राहुल गांधी…

Read More

पैंजण विकत घेण्याच्या बहाण्याने आले आणि ७ पैंजण चोरुन नेले, ५ जणांची टोळी जेरबंद

पुणे – चांदीची मोड देऊन पैंजण विकत घेण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषांनीसराफाची नजर चुकवून ७ पैंजण चोरुन नेले. या प्रकरणी ५ जणांच्या टोळीला लोहगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. कल्पना अंकुश कांबळे (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर), पांडुरंग राम गायकवाड (वय ४२, रा. रुपीनगर, निगडी), दिक्षा वसंत शेलार (वय ३२, रा. रुपीनगर, निगडी), सुमन बाबासाहेब…

Read More

पुण्यात गाजलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता 

पुणे – पुण्यात मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी २४ वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे यांचा सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. याप्रकरणी पती राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू, सासरे व नणंदेसह ११ जणांवर गुन्हे दाखल होऊन आरोपपत्र दाखल झाले….

Read More

मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर भातन बोगद्यात अपघात, बसची चार वाहनांना धडक, १० जण जखमी 

खोपोली – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील भाताण बोगद्यात ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात होऊन आठ ते दहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.   मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात एक…

Read More

श्रावणधारा कविसंमेलन उत्साहात संपन्न

पिंपरी- शेजारच्या हिरव्यागार डोंगररांगेतून शुभ्रधवल पाण्याच्या धारा खळाळत होत्या आणि पायथ्याच्या अथांग जलाशयात विसावत होत्या. निसर्गसंपन्न आसमंतात श्रावणसरी बरसत होत्या आणि याच डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिवे गावातील ज्ञानदीप विद्यालयाच्या सभागृहात सुरेल शब्दांच्या सरी बरसत होत्या! कविता, भावना, विचार आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवत ‘श्रावणधारा कविसंमेलन’ मोठ्या उत्साहात रंगले होते.  खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्गसंपन्न शिवे येथील…

Read More

‘अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती’ -पद्मश्री गिरीश प्रभुणे 

पिंपरी – अवयवदान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती होय.कारण अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आणि विद्यादानापेक्षा अवयवदान आधिक श्रेष्ठ आहे. म्हणून गुणवंत कामगारांनी व्यापक मोहीम राबवून अवयव दान जनजागृती करावी असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम व महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी…

Read More