पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार
पिंपरी, पुणे – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत आहेत असा विश्वास शहर प्रमुख चेतन पवार यांनी मातोश्री येथे दिला. गुरुवारी सकाळी चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड, भोसरी…
१,२८० विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तके द्या; दोषींवर कारवाई करा – नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी- : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सुमारे १,२८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करावा तसेच या प्रकरणास जबाबदार…
राष्ट्रीय ई-गवर्नेंस पुरस्कार 2026 में मध्यप्रदेश को साइबर सुरक्षा श्रेणी का रजत पुरस्कार
भोपाल। मध्यप्रदेश के नगरीय विकास एवं आवास विभाग ने राष्ट्रीय ई-गवर्नेंस पुरस्कार 2026 के अंतर्गत साइबर सुरक्षा श्रेणी में प्रतिष्ठित रजत पुरस्कार प्राप्त कर प्रदेश को राष्ट्रीय स्तर पर गौरवान्वित किया है। यह सम्मान भारत सरकार के प्रशासनिक सुधार एवं लोक शिकायत विभाग द्वारा 29वें राष्ट्रीय ई-गवर्नेंस पुरस्कार समारोह में जयपुर में प्रदान किया गया।…
लायन्स क्लब भोजापूर गोल्डतर्फे डॉक्टर्स डे निमित्त २२ डॉक्टरांचा गौरव
भोसरी-वीस वर्षांपासून लायन्स क्लब भोजापूर गोल्डची सेवावर्षाची सुरवात समाजातील कर्तृत्ववान आणि सेवाभावी डॉक्टरांच्या सन्मानाने करण्यात येते. वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपत आपल्या ज्ञान, अनुभव आणि सेवाभावातून गोरगरीब रुग्णांसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्याची परंपरा क्लबने अखंडपणे जपली आहे. यावर्षी डॉक्टर्स डे निमित्त प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. विजय सातव आणि नामवंत ऑर्थोडॉन्टिस्ट डॉ. विजय राहळकर या…
देहू ते आळंदी पालखी मार्ग “संतभूमी” म्हणून जाहीर करा – अभय टिळक
पिंपरी, पुणे – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी, देहू आणि टाळगांव चिखली, तळवडे या पंचक्रोशीस वारकरी संप्रदाय मनोभावे नमन करून “संतभूमी” मानतो. देहू ते आळंदी हा १६…
चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया! – पांडुरंग बलकवडे
पिंपरी -‘जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी महान भारत घडविण्याचा आपण संकल्प करूया!’ असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित पुण्यातील गणेशखिंड ते चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय दरम्यानच्या मशाल दौड आणि बाईक रॅलीचे उद्घाटन करताना बलकवडे…
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अध्यक्ष कामगारनेते यशवंत भोसले कंबर कसून मैदानात उतरले . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंत…
भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे! – डॉ. सविता केळकर
पिंपरी – ‘जागतिक पातळीवर भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे असून ते आत्मसात करणे गरजेचे आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांनी केले. भाषा अकॅडमी, पिंपरी आयोजित परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. सविता केळकर बोलत होत्या. जर्मन भाषातज्ज्ञ अरविंद लिगाडे, ज्येष्ठ विद्यापीठ भाषा संचालक जावेद अत्तार, पुणे…
जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे
पिंपरी – ‘जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. बाई जात्यावर दळायला बसली की ओव्या सुचत आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गोशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित जात्यावर दळताना साहित्य विश्वातील पहिल्या ‘सुंदर माझे जाते गं…’ या अभिनव कविसंमेलनाचे…
माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे -रंगनाथ महाराज नाइकडॆ
मोशी – माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे आहे.आई लेकराला जन्म देते ,वाढवते, त्याच्या ओंजळीत सार विश्व रीतं करते पण लेकरू मोठ झाल की आईलाच विसरतं म्हणून माणसाची विचित्र अवस्था झाली आहे तर पर्यावरणावर हि वेळ आली आहे.असे मत रंगनाथ महाराज नाईकडे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाविषयी विविध अध्यात्माचे दाखले देत मार्गदर्शन केले….
