‘अथर्वला शरीरसंबंध ठेवायचे आहेत, तो मला गोळी देतोय”, मुलीचा आईला शेवटचा फोन, आणि..
बारामती- येथील २३ वर्षीय तरुणीचा संशयस्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणीने मृत्यूपूर्वी आईला फोन करून सांगितले होते की ” अथर्व मला गोळी देणार आहे, त्याला माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत” त्यामुळे तिला कोणती गोळी देण्यात आली? तिच्या मृत्युचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस करत आहेत. मृत्युपूर्वी काही तास तरुणीचा आईला फोन आल्यामुळे या प्रकरणाला…
पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तळेगावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोन जखमी
शिरवळ -सातारा-पुणे रस्त्यावर शिरवळजवळ भरधाव कार डिवायडरला धडकून उलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ हॉटेल शिवालयसमोर ११ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वेदांत अर्जुन वारिंगे (रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (रा. कामशेत, मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (रा….
‘मुळशी पॅटर्न’च्या नावाने पुन्हा मुळशीची बदनामी नको; मुळशीकर आक्रमक
पुणे -‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामुळे मुळशी तालुक्याची गुन्हेगारी अशी चुकीची ओळख निर्माण झाली असून, त्याचे दूरगामी परिणाम आजही मुळशीकरांना भोगावे लागत असल्याची भावना मुळशीकरांकडून व्यक्त होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विवाहाच्या बाबतीतही मुळशीकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुळशी हा वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि कुस्तीगिरांचा तालुका आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ ही गुन्हेगारीची…
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच करण्यासाठी प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
पुणे – जगातील १९ देशांमध्ये रेडिओ क्वाएट झोनच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ जुन्या मार्गानेच व्हावा या मागणी संदर्भात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान…
किंचाळणे ऐकून लोक आले आणि तिची सुटका झाली ; पिंपरीत चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांचा हल्ला
पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस मांडला असून ७ भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना म्हेत्रे वस्ती भागात घडली. सुदैवाने या घटनेत चिमुरडी बचावली पण तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात भटक्या ७ भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. अशिंका मिश्रा असे या चिमुरडीचा नाव आहे. या…
पुणे शहरात उद्या मंगळवारी भाजपची तिरंगा रॅली, वाहतुकीच्या मार्गात होणार बदल जाणून घ्या
पुणे- शहरात मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून भाजपच्या वतीने भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सुमारे १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या रॅलीमुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ललित महाल हॉटेल चौक येथून या रॅलीची सुरुवात होणार असून…
परंपरागत कामगार कायदे लागू करा – कैलास कदम कामगार संघटनांचे देशव्यापी जेलभरो आंदोलन
पिंपरी- केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेले चार नवीन कामगार कायदे कायमस्वरूपी रद्द करून जुने परंपरागत कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी कामगार संघटनांनी देशव्यापी जेलभरो आंदोलन केले. पिंपरीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आयटक चे अनिल रोहम, सीटू…
विमानतळजवळील नामांकित पबवर पोलिसांची धाड, दोघा मॅनेजरसह 8 जणांना अटक
पुणे- विमानतळ परिसरातील ‘द हौज कम्युन’ या पबवर रविवारी पहाटे तीन वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अचानक छापा टाकून पबमधील दोघा मॅनेजरसह 8 जणांना अटक केली आहे. या पबमध्ये पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने रंगारंग पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या या छाप्यात उघडकीस आले. सुमित रोहीदास गोटे (वय ३०, रा. येरवडा), नूर हुसेन शेख (वय ३०,…
ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेत दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व
पिंपरी- आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेने यावर्षी २०० मुलींच्या शिक्षणाला मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा मुलींची निवड करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रीती नारायण यांनी कार्तिक सरांच्या सहकार्याने दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी…
खड्ड्यातील पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू , पुण्यातील दिघी गावातील घटना
पिंपरी- शाळेच्या मागे पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून एका १५ वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दिघीमधील मॅगझीन चौकाजवळ घडली. आश्वेत अनिल भोसले (वय १५ रा. संत गजानन महाराज नगर, दिघी ) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आश्वेत हा दिघी येथील रामचंद्र गायकवाड शाळेमध्ये इयत्ता ९ वीत शिकत होता. घटनेची…
